जिल्हा परिषद सांगली
Zilla Parishad Sangli

ग्रामपंचायत विभाग

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे 
1 ग्रामपंचायत विभागग्रामपंचायत यात्रास्थळ विकास कार्यक्रम0-ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्र / यात्रास्थळांचा विकास करणे. यात्रेकरु / प्रवासींना प्राथमिक स्वरुपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे -तिर्थक्षेत्र / यात्रास्थळांना भेट देणा-या यात्रेकरु / प्रवाशांची संख्या वार्षिक एक लाख असणे आवश्यक -यात्रास्थळांपर्यतच्या जोड रस्त्याचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, धर्मशाळा, वाहनतळ, बगीचा इ. स्वरुपाची पायाभूत सुविधा.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
2 ग्रामपंचायत विभागग्रामपंचायतीना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान03000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठया ग्रामपंचायतींचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषि औद्योगिक आणि वाणिज्यिक विकास करणे. त्यासाठी प्राधान्याने व प्राथम्याने तेथील राहणीमान दर्जेदार होण्यासाठी शहराच्या तोडीच्या मूलभत सुविधा व रोजगार संधी उपलब्ध करुन देणे. कामाचे स्वरुप :- 1)नियोजनबध्द विकास 2) बाजारपेठविकास 3) सार्वजनिक दिवाबत्तीची सोय 4) बागबगिचे, उद्याने तयार करणे 5) अभ्यासकेद्र बांधणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
3 ग्रामपंचायत विभागग्रामपंचायतीना जन सुविधांसाठी विशेष अनुदान0-जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण भागात दहन/दफनभूमीमध्ये तसेच ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे याबाबीमध्ये अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे -ग्रामसभेमार्फत निवडलेल्या कामांना ग्रामपंचायतीने मंजूरी देणे आवश्यक -संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मार्फत जिल्हा परिषदेकडे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
4 ग्रामपंचायत विभागअल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा क्षेत्रविकास कार्यक्रम0उद्देश :- ज्या ग्रामीण भागात अल्पसंख्याकांची लोकसंख्या लक्षणीय आहे अशा ग्रामीण भागात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन या भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे अटी व शर्ती :- ज्या ग्रामपंचायतीच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याक समूहाची ( मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी ) लोकसंख्या किमान 100 किवा जास्त असणे आवश्यक. कामाचे स्वरुप :- कब्रस्तान/स्मशान/अंत्यविधीच्या जागेसाठी संरक्षक भिंतीसह सर्व सुविधा, 2) सार्वजनिक सभागृह / शादीखाना हॉल, 3) सर्व नागरी / पायाभूत सुविधा. उदा. पिण्याच्या पाण्याची सुविधा/विद्युत पुरवठा/इदगाह/सांडपाण्याची व्यवस्था/रस्ते/पथदिवे/सार्वजनिक स्वच्छतागृहे/अंगणवाडी, बालवाडी केंद्र इ. अर्ज कोणाकडे करावा :- ग्रामसभेच्या मंजूर ठरावासह प्रस्ताव गट विकास अधिकारी यांजकडे दि. 15 जून पर्यत व दि. 15 जुलै पर्यत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.कडे प्रस्ताव सादर करणे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
5 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना0योजनेची ठळक वैशिष्टये :- 1) ग्रामीण भागातील अंगमेहनतीने अकुशल काम करण्याची तयारी असलेल्या कुटुंबांना आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी या कायदयामध्ये आहे. 2) या योजनेंतर्गत किमान 50% खर्चाची कामे ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत करणेची आहेत.उर्वरित कामे इतर शासन यंत्रणेमार्फत करणेची आहेत. 3) कामांचे अकुशल व कुशल यांचे प्रमाण पंचायत समिती स्तरावर हे 60:40 प्रमाण राखले जाईल हे पहावयाचे आहे. 4) कामाची मागणी करण्या-या कुटुंबांची नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर कुटुंबास रोजगारपत्रक (जॉबकार्ड) दिले जाईल कुटुंबाची नोंदणी पाच वर्षाचे कालावधीकरिता असेल. सन 2012-13 मध्ये 117262 मजूरांना जॉबकार्ड काढणेत आलेले आहे. जॉबकार्ड नूतनीकरण मोहिम जिल्हयात सुरु असून जॉबकार्ड काढणेसाठी 32000 हजार कुटुंबांचे फोटो काढून पूर्ण करणेत आले आहे. 5) अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवून सामाजिक अंकेक्षणाचे तत्व अनुसरले जाईल. सर्व माहिती कामावर, ग्रामपंचायतीमध्ये व वेबसाईटवर उपलब्ध करुन देणेची आहे. 6) योजनेंतर्गत कामासाठी वापरण्यात येणा-या प्रत्येक हजेरीपटास विशिष्ट क्रमांक असेल. 7) मग्रारोहयो कामावरील स्त्री / पुरुष मजूरांना मजूरीचा दर समान असेल सद्याच्या मजूरीचा दर रुपये 145/- प्रतिदिन आहे. कामाचे मुल्यांकनावर आधारीत मजूरी दिली जाते. 8) मजूरीचे प्रदान पोष्ट / बँक खात्यामार्फत. काम केल्यावर जास्तीत जास्त 15 दिवसात मजूरी वाटप. जिल्हयात 57293 मजूरांची खाती पोष्टात उघडलेली आहेत. तसेच 4799 मजूरांची खाती राष्ट्रीयकृत बँकत उघडणेत आलेली आहेत. 9) कामावर कंत्राटदार लावण्यास बंदी आहे. तसेच मजूरामार्फत करता येण्यासारख्या कामावर मशिनरी लावण्यास बंदी आहे. 10) तक्रार निवारणेसाठी अंबूड्समॅन ( ची नेमणूक. ( आपल्या जिल्हयात श्री. प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, मु. लोटे, ता. खेड. यांची तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी नं. 9422052132) 11) गावापासून 5 किमी अंतरावर रोजगार दिल्यास 10% जास्त मजूरी, कामावर पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, बरोबर आणलेल्या 6 वर्षाखालील लहान मुलांना सांभाळण्यासाठी सोय, तसेच दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्ण सेवा तसेच दैनिक मजूरीच्या 50% सानुग्रह रुग्ण भत्ता अपंगत्व व मृत्यु झाल्यास रक्कम रुपये 50,000 पर्यंत सानुग्रह अनुदान व कुटुंब नियोजनासाठी सवलती. योजनेंतर्गत कामाचे स्वरुप :- 1) जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, कंपार्टमेंट बांध, वनराई बंधारे, जैविक बांध, सलग समतलचर, सामूहीक शेततळे, साठवण तलाव, गाव तलाव, भूमिगत बंधारे इ. दुष्काळ प्रतिबंधक कामे वृक्षलागवड वनीकरण इ. 2) जलसिंचन कालव्याची कामे मातीचे कालवे, कालव्याचे नूतनीकरण. 3) अनुसूचित जाती / जमाती इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण सुविधांची कामे. 4) पारंपारिक पाणीसाठयाचे नूतनीकरण करणे व तलावातील / विहीरीतील गाळ काढणे. 5) भूविकासाची कामे. 6) फळबाग लागवड 7) रोपवन संगोपन 8) खत निर्मिती (नॅडेफ खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, संजिविके किंवा अमृतपाण्यासाठी खड्डा/ अझोलासाठी खड्डा.) 9) मत्स्यपालन :- अ) सार्वजनिक ठिकाणी (हंगामी )मत्स्यपालन करणे. ब) समुद्र किनाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी मासे सुकविण्याकरिता काँक्रिटचा ओटा बांधणे. 10) भाजीपाला निर्मिती. 11) जल व घन कचरा व्यवस्थापन अ) समुद्रावर भरती ओहोटीचे पाणी अडविण्यासाठी बांधावयाचे कट्टे. ब) शोष खड्डा:- सार्वजनिक व वैयक्तिक क) पुनर्भरण खड्डा :- सार्वजनिक / वैयक्तिक 12) स्वच्छता गृहे:- अ) वैयक्तिक स्वच्छता गृहे. ब) शालेय स्वच्छता गृह. क) अंगणवाडी स्वच्छता गृह. ड) सार्वजनिक स्वच्छता गृहे 13) कुक्कुट पालनासाठी शेड 14) शेळयासांठी गोठा 15) जनावरांसाठी पक्क्या बांधकामाचा गोठा / गव्हाण व मूत्र निस्सारणासाठी टँक. 16) पूरनियंत्रण व पूरसंरक्षक कामे. 17) ग्रामीण जोडरस्त्यांची कामे- गावातील अंतर्गत जोड रस्ते. 18) राज्य शासनाशी चर्चा करुन केंद्र शासनाने मान्यता दिलेली इतर कामे. 19) राजीव गांधी भवन.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
6 ग्रामपंचायत विभागआर.आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना"0राज्यातील गावंाचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्यात सन-2010-11 पासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविणेत येत होती. सदर योजनेचे रुपांतर करुन सन-2016-17 पासून स्मार्ट ग्राम योजना राबविणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानंतर संदर्भ क्र.2 अन्वये स्मार्ट ग्राम योजनेस "आर.आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना" असे नाव देण्यात आले आहे. या योजनेकरिता निवडण्यात येणारी पंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पध्दतीने पारदर्शकता ठेवून निवडली जाणार असुन या करीता गावाची विभागणी खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे. 1. मोठया ग्रामपंचायती 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी 2. शहरालगत असणा-या ग्रामपंचायती 3. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती (अगोदर कार्यक्रमात सहभागी झालेली) 4. आदिवासी/पेसा ग्रामपंचायती 5. उर्वरीत ग्रामपंचायती मोठया ग्रामपंचायती, आदिवासी ग्रामपंचायत, शहरालगत असणारी ग्रामपंचायत व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत यांचेमध्ये सामाजिक, सांस्कृतीक व आर्थिक दृष्टिकोनातून खुप मोठी तफावत दिसून येते याकरिता सदरील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन देण्यात आले आहे. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर संक्षिप्तमध्ये "सुंदर गाव निवड" या आधारावर ही गुणांकन पध्दत आधारीत असून या करिता 100 गुण ठेवण्यात आले आहेत.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
7 ग्रामपंचायत विभागसांसद आदर्श ग्राम योजना0उद्देश :- 1) निवडलेल्या ग्रामपंचायतीचा समग्र विकास साधणा-या प्रक्रियांचा वेग वाढविणे. 2) जनतेच्या सगळयाच वर्गांचे राहणीमान आणि जीवनमानात निम्नांकित उपायांनी, वास्तविक सुधारणा आणणे. 3) स्थानिक पातळीवरील विकासांच्या आणि परिणामकारी स्थानीय शासनाचे आदर्श निर्मित करणे ज्यामुळे आसपासच्या ग्राम पंचायतींना शिकण्याची आणि या आदर्शांना स्वीकारण्याची प्रेरणा मिळू शकेल. 4) निवडलेल्या आदर्श गावांना स्थानिक विकासाच्या विदयालयाप्रमाणे वाढवणे जेणे करुन इतर ग्रामपंचायतींना प्रशिक्षित करता यावे. दृष्टीकोन :- उद्देशांच्या पूर्तीसाठी सांसद आदर्श ग्राम योजनेचे मार्गदर्शन निम्नांकित दृष्टीकोणाने होईल. 1) खासदारांना(सांसदांना) आदर्श ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेतृत्व, क्षमता, प्रतिबध्दता आणि उर्जा यांचा उपयोग करण्यास प्रवृत्त करुन कार्यकुशलता वाढवावी. 2)स्थानिक पातळीवर भागीदारीसह विकास साधण्यासाठी सगळया समुदायांना एकजूट करुन त्याकरवी कामे करवणे. 3) जन-आकांक्षा आणि स्थानिक क्षमतेनुरुप व्यापक विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी विभिन्न सरकारी कार्यक्रम आणि खाजगी आणि स्वैच्छिक क्षेतत्रातील पुढाकार या दोन्हीत ताळमेळ बसवावा. 4) स्वैच्छिक संगठन, सहकारी संस्था, शैक्षणिक व अनुसंधान कार्य करणा-या संस्थासोबत भागीदारी वाढवणे. 5) परिणाम आणि सातत्यावर लक्ष केंद्रित ठेवणे. कामाचे स्वरुप :- सांसद आदर्श ग्राम योजनांतर्गत निवड झालेल्या गावाने आपला विकास खासदार, ग्रामपंचायत, गावकरी आणि सरकारी तंत्राच्या यथोचित सुविधांच्या सहाय्याने लोकांच्या सहभागी विचार-विनिमयाने त्यांची कार्यक्षमता आणि उपलब्ध संसाधने इत्यादिंचा जास्तीत जास्त उपयोग साधून करावा. वैयक्तिक विकास, मानवी विकास, सामाजिक विकास,आर्थिक विकास, पर्यावरण विकास, मूलभूत सुविधा आणि सेवा, सामाजिक सुरक्षा, सुशासन आदर्श ग्राम ची निवड :- 1) ग्रामपंचायत हे मूळ एकक राहील, सपाट,मैदानी भागात एका पंचायतीची लोकसंख्या 3000 ते 5000, पर्वतीचे, जनजातीय,दुर्गम क्षेत्रात 1000 ते 3000 राहू शकेल, असे जिल्हे जिथे या एककाचा आकार निश्चित नसेल तेथे अशा ग्रामपंचायतींची निवड होऊ शकेल.2) संबंधित खासदार महोदयांस त्यांना योग्य वाटेलेली ग्रामपंचायत निवडण्याचे स्वातंत्र्य राहील. पण त्यांनी आपले स्वत:चे वा आपल्या पतीचे/पत्नीचे गांव निवडू नये. 3) सांसद एक ग्राम पंचायत तात्काळ विकासासाठी निवडतील व आणखी दोन ग्रा.पं. काही अवधीनंतर निवडून ठेवतील. 4) प्रारंभीचे लक्ष्य मार्च 2019 पर्यंत तीन आदर्श ग्राम विकसित करण्याचे आहे. त्यापैकी एक 2016 पर्यंत साधले जाईल, त्यानंतर अशा पाच आदर्श गावांची निवड करण्यात येईल. ( दरवर्षी एक याप्रमाणे) आणि 2024 पर्यंत त्यांचा विकास करण्यात येईल.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
8 ग्रामपंचायत विभागग्रामीण भागातील बेघरांना घर बांधणे साठी यशवंत-वसंत घरकुल योजना(1) सक्षम प्राधिकाऱ्याचा (तहसिलदार / प्रांत अधिकारी ) उत्पन्नाचा दाखला. (2) स्वत:च्या नावे असणाऱ्या जागेचा 8अ उतारा. असेसमेंट लिस्ट नुसार किमान क्षेत्रफळ 269 चौ.फु असावे. (3) संबंधित अर्जदाराचे रहिवासी असलेले स्वयंघोषणापत्र . (4) यापुर्वी सदर किंवा तत्सम प्रकारच्या वैयक्तीक लाभाच्या योजनेचा अर्जदाराने किंवा त्याच्यां कुटुंबातील सदस्याने लाभ घेतला नसल्याबाबतचा अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र. (5) कुटुंबातील सदस्य शासकिय / निमशासकिय सेवेत नसलेबाबतचा अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र. (6) गावामध्ये अर्जदाराचे किंवा त्याचे कुटुंबियांचे नावे कोणतेही पक्के घर नसलेबाबत अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र. (7) अर्जदाराच्या आधारकार्डाची छायांकीत प्रत. (8) रेशकार्डाची छायांकीत प्रत. (9) आपत्ती , पुरग्रस्त इत्यादी बाधित असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
9 ग्रामपंचायत विभागराजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनाकलाकार व साहित्यिक : कलाकार जे कलाकार १५ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात (performing art) सादरीकरण करणारे, केवळ संबंधित कलेवरच गुजराण असणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. साहित्यिक- जे साहित्यिक १५ वर्षापेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे केवळ त्यावरच गुजराण असणारे साहित्यिक. कलाक्षेत्राशी निगडीत लेखन / समीक्षक अशा साहित्यिकांचा या योजनेसाठी पात्र असतील. मानधन : कलावंतांना सरसकट एकच श्रेणी रुपये ५,०००/- इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन लाभार्थ्यांस तहहयात मिळेल. त्यासाठी पुन्हा प्रत्येक वर्षी नव्याने जिल्हास्तरीय समितीस कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. फक्त प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. सदर मानधन लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तसेच, सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक १ एप्रिल, २०२४ पासून करण्यात येईल. पात्रता: १. ज्यांचे वय ५०पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १०वर्षाने शिथिल करण्यात येत आहेत. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्षे) २. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे. ३. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. ४. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/ दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. ५. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. ६. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. ७. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. ८. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 ग्रामपंचायत विभागग्रामसभेच्या बैठकीच्या तारखा कोणत्या ?• २६ जानेवारी • १ मे • १५ ऑगस्ट व • माहे नोव्हेंबर / डिसेंबर • २ ऑक्टोंबर विशेष ग्रामसभा
2 ग्रामपंचायत विभागग्रामपंचायतीची रचना कशी असते?राज्य शासन विहित करील असे सात पेक्षा कमी नसतील आणि सतरा पेक्षा अधिक नसतील इतके सदस्य कार्यरत असतील.
3 ग्रामपंचायत विभागग्रामसभेच्या बैठकीसाठी प्रसिद्धी कश्या प्रकारे देण्यात येते ?ग्रामसभेच्या बैठकीला गावातील जास्तीत जास्त लोकांनी व त्यातल्या त्यात महिलांची उपस्थिती आवश्यक आहे. यासाठी ग्रामसभेच्या बैठकीची पुरेशा प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी लाउडस्पीकरचा वापर करण्यात यावा किंवा घरोघरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जाऊन ग्रामसभेच्या बैठकीची लेखी सूचना बजावून लोकांना कल्पना द्यावी.
4 ग्रामपंचायत विभागग्रामसभेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या वेळेत करावे ?ग्रामसभेच्या बैठकीसाठी जास्तीत जास्त लोकांनी व महिलांनी उपस्थित रहावे यासाठी बैठकीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज आहे. सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत बहुतेक शेतकरी शेतात कामावर असतात त्यामुळे दिवसा जी बैठकीला बोलावले तरी ते बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत. सबब रात्रीच्या वेळी जर ग्रामसभेची बैठक ठेवली तर या बैठकीस बहुतेक गावकरी व जास्त प्रमाणात महिला उपस्थित राहू शकतील म्हणून दिवसा ग्रामसभेच्या बैठकीस उपस्थिती कमी असल्यास रात्री ८.०० च्या सुमारास ग्रामसभेची बैठक आयोजित करावी.
5 ग्रामपंचायत विभागग्रामसभेच्या बैठकीसाठी किती मतदाराची उपस्थिती किती आवश्यक असते ?प्रत्येक वित्तीय वर्षी ग्रामसभेच्या निदान चार बैठकी सभा झाल्या पाहिजेत. ग्रामसभेच्या बैठक बोलावण्याची जबाबदारी सरपंच व त्याचे गैरहजेरीत उपसरपंचावर आहे. ग्रामसभेच्या चार सभांपैकी कोणतीही एक सभा भरविण्यास सरपंच किंवा उपसरपंच चुकल्यास तो पदावर अपात्र ठरतो. ग्रामसभेची बैठक न बोलावण्यास पुरेसे कारण होते किंवा नाही या प्रश्नाचा निर्णय मा. जिल्हाधिकारी देतात. वरील चार बैठकीशिवाय ग्रामसभेची एक अगर जास्त बैठका भरविण्याचा अधिकार सरपंचाला आहे. सरपंच स्वतःहून अशी जादा बैठक बोलावू शकतात. स्थायी समिती, पंचायत समिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक बोलावण्याची मागणी सरपंचाकडे केल्यास ग्रामसभेची बैठक भरविणे हे सरपंचाचे कर्तव्य आहे. बैठक बोलावण्याची मागणी ग्रामसभेच्या सभासदांनी सरपंचाकडे केल्यास त्यांनी बैठक बोलावालीच पाहिजे असे त्याचेवर बंधन नाही. परंतु त्या मागणीप्रमाणे बैठक न बोलावल्यास ग्रामसभेचे सभासद जिल्हा परिषदेकडे किंवा पंचायत समितीकडे अर्ज करून बैठक भरविण्याबद्दल मागणी करू शकतात. ग्रामसभेचे कोरम १०० किंवा लोकसंख्येच्या १५ टक्के यापैकी कमी असेल अशा संख्येच्या सभासदांचा असतो.
6 ग्रामपंचायत विभागग्रामसभेचा अध्यक्ष कोणाला होता येते ?ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या ग्रामसभेचा व त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच व त्यांचे गैरहजेरीत उपसरपंच राहील. सरपंच व उपसरपंच यांचे गैरहजेरीत तेथे हजर असलेल्या पंचायतीचे सदस्यांपैकी एकाला सदर बैठकीचा अध्यक्ष ग्रामसभेचे सदस्य निवडतील. त्यानंतर होणाऱ्या ग्रामसभेचा अध्यक्ष त्या ग्रामसभेचे उपस्थित असलेल्या ग्रामसभा सदस्य निवडतील ती व्यक़्ती असेल.
7 ग्रामपंचायत विभागग्रामसभेला कोणाला उपस्थित रहाता येते ?गावच्या मतदार यादीत नाव असलेल्या इसम ग्रामसभेचा सभासद असतो. एखाद्या इसमाला ग्रामसभेच्या बैठकीला हजर राहण्याचा हक्क आहे किंवा नाही असा वाद उपस्थित झाल्यास बैठकीच्या वेळी अध्यक्षाने सदर वादाचा निर्णय द्यावा.
8 ग्रामपंचायत विभागग्रामसभेच्या कामकाजामध्ये कोणकोणते विषय ठेवता येतात ?प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वर्ष सुरु झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत भरवली पाहिजे आणि पंचायतीचे अशा बैठकीपुढे पुढील गोष्टी ठेवल्या पाहिजेत. • वार्षिक लेखा विवरणपत्र • मागील वित्तीय वर्षाचा प्रशासन अहवाल • चालू वित्तीय वर्षात करावयाचा योजनेचा विकास व इतर कार्यक्रम • मागील लेखा परीक्षेचे टीपण व त्याला उत्तरे • स्थायी समिती, पंचायत समिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीपुढे ठेवण्यास सांगेल अशी इतर कोणतीही बाब • पंचायत प्रत्येक सहामाहि मध्ये एकदा, विकास विषयक कामांवर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवील आणि त्याची माहिती पंचायतीच्या सूचना फलकावर लावील. • राज्य सरकार सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे फर्माविल अशी इतर कोणतेही कामे ग्रामसभा पार पाडील.
9 ग्रामपंचायत विभागग्रामसभेचे अधिकार व कर्तव्ये कोणती आहेत ?• पंचायतीकडून राबविण्यात येतील अशा सामाजिक किंवा आर्थिक विकासाच्या योजना, कार्यक्रम व प्रकल्प यांना, अशा योजना, कार्यक्रम व प्रकल्प यांच्या अंमलबजावणीचे काम त्या पंचायतीने हाती घेण्यापूर्वी मान्यता देणे. • विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची पंचायतीला परवानगी देणे. • पंचायतीच्या अधिकारितेत येणारी कोणतीही जमीन शासकीय प्रयोजनार्थ, संबंधित भूमी संपादन प्राधिकरणाद्वारे संपादित करण्याच्या कोणत्याही प्रस्तावा संबंधात पंचायतीकडून कोणताही निर्णय घेण्यात येण्यापूर्वी पंचायतीला आपली मते कळविणे.
10 ग्रामपंचायत विभागग्रामसभेमध्ये स्थापन करावयाच्या समित्या कलम ४९ नुसार कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात ?कलम ४९ नुसार ग्रामसभेला ग्रामपंचायतीची कर्तव्ये व कामे पार पाडणेसाठी एक किंवा अनेक ग्रामविकास समित्या गठीत करता येतील. अश्या ग्रामविकास समित्या या ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली व ग्रामसभेच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
11 ग्रामपंचायत विभागग्रामसभेमध्ये कोणत्या विषयाची चर्चा करता येत नाही याची माहिती मिळावी• प्रस्ताव बदनामी स्वरूपाच्य असतील. • प्रस्तावातील भाषा अपमानास्पद असेल. • प्रस्ताव लोकहित विरोधी असेल. • प्रस्ताव एखाद्या न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत असेल. • प्रस्ताव संदिग्ध स्वरूपाचा व कोणतीही निश्चित मुद्दा उपस्थित करणारा नसेल.
12 ग्रामपंचायत विभागग्रामसभेला विषय देण्याबाबतची काय कार्यपद्धती असते ?कोणाही ग्रामस्थाला ग्रामसभेच्या बैठकीत एखादा प्रस्ताव मांडावयाचा असेल तो त्यांनी सरपंचाकडे बैठकीच्या तारखेआधी दोन दिवस सादर करावा.
13 ग्रामपंचायत विभागग्रामपंचायतीची स्थापना कश्याप्रकारे करण्यात येते ?ज्या महसुली गावी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावयाची असेल त्या गावची लोकसंख्या २००० असणे आवश्यक आहे. केवळ अपवादात्मक प्रकरणात (उदा. आदिवासी व तांडा या भागांसाठी किंवा दोन गावांत जर तीन कि.मी पेक्षा जास्त अंतर असेल ) तर त्या भागाकरिता किमान लोकसंख्या १००० असणे आवश्यक आहे. पाटबंधारे प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी जी नवी गावठाण बसविता येतात. अशा ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याकरिता प्रस्तावित ग्रामपंचायतीने किमान लोकसंख्या ३५० असणे आवश्यक आहे.
14 ग्रामपंचायत विभागग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात करआकारणीला नाव लावणे बाबत कोणती कार्यपद्धती आहे ?ग्रामपंचायतीच्या कर आकारणीला नाव लावणेसाठी आवश्यक कागदपत्रे (वडिलोपार्जित घरासाठी ) अ) ग्रामपंचायतीकडे मागणी अर्ज आ) वडिलोपार्जित घराचा उतारा इ) वंशावळ (सर्व हिस्सेदारांची ) ई) घराचा किती हिस्सा कोणाचे नावे लावणे यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र अथवा घरावर एकाचेच नाव लावणेचे संमतीपत्र
15 ग्रामपंचायत विभागगावातील अतिक्रमण हटविणेसाठी कार्यवाही कोणी करावयाची ?• शासकीय जमिनीवरील अतिक्रमण संदर्भात महसूल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक जमीन ०३/२००९/प्र.क्र.१३/ज-१ दिनांक ७ सप्टेंबर २०१० नुसार शासकीय जमिन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाने सदर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी लागेल. • खाजगी जमिनीवरील अतिक्रमणाबाबत शासन निर्णय दिनांक ११ डिसेंबर २०१५ नुसार अ) गावठाण क्षेत्रातील जमिनी मध्ये अतिक्रमण झालेले असल्यास ते ग्रामपंचायत मार्फत काढणेत येईल आ) गावठाण क्षेत्राव्यतिरिक्त असलेल्या इतर क्षेत्रामध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणावरती कार्यवाही करावी लागेल.
16 ग्रामपंचायत विभागघर बांधकाम परवानगी देणेची कार्यपद्धती कोणती आहे ?अ) घर बांधकाम परवानगी मिळणे बाबत गावठाण क्षेत्राबाहेरील जागा असल्यास वर्ग -१ ची प्रांत अधिकारी व वर्ग -२ ची गावे तहसीलदाराकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आ) घर बांधकामासाठी गावठाण क्षेत्रात परवानगी आवश्यक असल्यास खालील प्रमाणे कागदपत्र ग्रामपंचायतीकडे देण्यात यावीत. • घर गावठाण क्षेत्रातील असल्यास ग्रापं कडे विहित नमुन्यात अर्ज व रु. ५/- किंमतीचा कोर्ट फि स्टँपं लावणेत यावा. • गाव नमुना नंबर ७/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, कुलमुखत्यारपत्र तसेच मालकी हक्काची इतर कागदपत्रे • जागेकरिता उपलब्ध असलेला अधिकृत मोजणी नकाशावर दर्शविलेला पोहोच रस्ता सदर पोहोच रस्त्याच्या दर्जा सक्षम प्राधिकरण नाहरकत दाखला तसेच इमारत रेषा / नियंत्रण रेषा दर्शविणारा संबंधित विभागाकडील स्वाक्षांकित नकाशा आवश्यक आहे. • तालुका निरीक्षक भुमी अभिलेख यांचे कडील जागेचा अद्यावत प्रमाणातील (१:५००, १:१००० ) अधिकृत मोजणी नकाशा • बांधकाम नकाशाच्या ४ नील प्रती
17 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नोंदणीचे अर्ज कोणाकडे सादर करावेत?सदर अर्ज ग्रामपंचायत किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये सादर करावेत.
18 ग्रामपंचायत विभागजॉबकार्ड मिळाले म्हणजे रोजगार मिळालेच असे आहे का?नाही.रोजगार मिळणेसाठी संबंधित व्यक्तीस अर्ज करणे गरजेचे आहे.
19 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामासाठी अर्ज केल्यानंतर त्याची पोचपावती अर्जदाराला मिळू शकते का?होय.ग्रामपंचायत तारखेसहित तशी पोचपावती अर्जदाराला द्यायला हवी.
20 ग्रामपंचायत विभागकामाची निवड करताना मजुरी आणि साहित्य यांचे प्रमाण काय असते?जिल्हा स्तरावर कामाची निवड करताना मजुरी व साहित्य यांचे प्रमाण ६०-४० असते.
21 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे (NREGA) उद्दिष्ट काय?महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याने प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्तीला किमान १०० दिवस काम मिळण्याची कायदेशीर हमी मिळते. त्यांच्यामार्फत अकुशल कामे करून घेतली जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा २ फेब्रुवारी २००६ रोजी अंमलात आला. महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानुसार संबंधित राज्यासाठी निर्धारित केलेल्या दराने त्याला किंवा तिला मजुरी मिळते. मजुरीचे हे दर केंद्र सरकारच्या ग्राम विकास खात्याकडून जाहीर केले जातात.
22 ग्रामपंचायत विभागया कायद्यानुसार कोण अर्ज करू शकते ?कोणत्याही गावातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्ती त्या परिसरात होणारे अकुशल काम करण्यासाठी अर्ज करू शकतात. एखादी व्यक्ती आधीपासून रोजगार करत असेल तर तो देखील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या आधारे रोजगारासाठी अर्ज करू शकते. महिलांना प्राधान्य दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत किमान १/३ महिलांची नोंदणी करून त्यांना काम दिले जाते.
23 ग्रामपंचायत विभागनोंदणी प्रक्रिया कशी असते ?एखादया व्यक्तीला या योजनेच्या माध्यमातून रोजगार हवा असेल तर त्याने लेखी अर्ज कराचा किंवा रोजगाराची तोंडी मागणी करावी. नोंदणी प्रक्रिया आणि त्यासाठीचा अर्ज मोफत दिला जातो.
24 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नोंदणी प्रक्रियेत ग्रामपंचायतीची भूमिका काय असते?नोंदणी अधिकृत करण्यसाठी ग्रामपंचायत ही अर्जदार त्याच गावचा रहिवासी आहे का आणि तो सज्ञान आहे, हे पाहते. नोंदणीसाठी घर एक घटक मानले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून घराला जॉबकार्ड दिले जाते.
25 ग्रामपंचायत विभागजॉब कार्ड म्हणजे काय?जॉबकार्ड म्हणजे मूळ कायदेशीर दस्तावे. त्याच्या आधारे नोंदणीत सदस्य रोजगाराची हमी मिळवू शकतो. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत जॉबकार्ड उपलब्ध व्हायला हवे. त्याची वैधता ५ वर्षेपर्यंत असते. जॉबकार्ड प्रत्येक नोंदणीत सदस्याचे नाव तसेच छायाचित्र असते. हे जॉबकार्ड किंवा छायाचित्र मोफत उपलब्ध करून दिले जाते.
26 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामासाठी कशाप्रकारे अर्ज दिला जातो?ज्याला काम हवे आहे त्याने ग्रामपंचायत किंवा कार्यक्रम अधिकाऱ्याकडे (ब्लॉक ऑफिस) लेखी अर्ज सादर करायला हवे. एक सदस्यही अर्ज करू शकतो.ही मागणी किमान १४ दिवस सलग कामाची असू शकते.
27 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीला किती दिवस रोजगार मिळू शकेल?या काद्यानुसार एखाद्या घरातील व्यक्तींना वित्तीय वर्षात १०० दिवस रोजगार मिळू शकतो. हे १०० दिवस घरातील विविध सदस्य एकमेकांत विभागून घेऊ शकतात. घरातील एकापेक्षा अधिक सदस्य एकावेळी काम करू शकतात किंवा वेगवेगळ्या वेळीही काम करू शकतात.
28 ग्रामपंचायत विभागरोजगाराबाबतची माहिती अर्जदाराला कशी मिळू शकेल?ग्रामपंचायत कार्यक्रम अधिकारी यांच्याकडून अर्जदाराला कोठे आणि कधी रोजगार उपलब्ध होणार हे पत्राद्वारे कळविले जाते. त्याशिवाय ग्रामपंचायत किंवा कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या ब्लॉक ऑफीसवर जाहीर नोटीस लावली जाते. त्यावर कामाचे ठिकाण, तारीख आणि रोजगार कोणाला उपलब्ध आहे त्यांचीनवे असतात.
29 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध होऊ शकले तर काय केले जाते?अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत अर्जदारालारोजगार उपलब्धझाला नाही तर दररोजचा बेरोजगारी भत्ता या कायद्यानुसार अर्जदाराला मिळू शकतो.
30 ग्रामपंचायत विभागअर्जदाराने कामाच्या ठिकाणी १५ दिवसांच्या आत हजेरी लावली नाही तर?अर्जदाराने कामाच्या ठिकाणी या काळात हजेरी लावली नाही तर त्याला बेरोजगारी भत्ता मिळणार नाही पण तो कामासाठी नव्याने अर्ज करू शकतो.
31 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील उपलब्ध होणार रोजगार कोणत्या परिसरात असतो ?अर्जदाराच्या निवासस्थानापासून ५ किमीच्या परिसरात हा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यापेक्षा अधिक अंतरावर जर रोजगार असेल तर अर्जदाराला १० टक्के अधिक रोजगार प्रवास व राहण्याच्या भत्त्यासाठी दिला जातो. अधिक वयाचे कामगार तसेच महिलांना घराजवळ रोजगार मिळावा यास प्राधन्य दिले जाते.
32 ग्रामपंचायत विभागकामाच्या ठीकाणी कामगारांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या जातात ?पिण्याचे स्वच्छ सुरक्षित पाणी, लहान मुलांसाठी निवारा,विश्रांतीसाठी काही वेळ, लहान-सहान जखमांवरील उपचारांसाठी तसेच आरोग्यविषयक अन्य समस्यांसाठी प्रथमोपचार पेटी,६ वर्षाखालील पाच पेक्षा अधिक मुले कामाच्या ठिकाणी असतील तर त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाते.
33 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये या कामात कंत्राटदार किंवा यंत्रसामुग्रीचा वापर होतो का?मजुर हा केंद्रस्थानी असल्याने येथे कंत्राटदार किंवा यंत्रसामुग्रीचा वापर होत नाही.
34 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या पद्धतीने काम येथे दिले जाते ?दीर्घकालीन उपयोगासाठी साधने ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनासाठी उपयुक्त साधनांची निर्मिती करणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. कंत्राटदारांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या कामांना परवानगी दिली जाते.यात प्राधन्यक्रमाने केली जाणारी कामे अशी आहेत. १.जलसंवर्धन आणि सिंचन २.दुष्काळ निवारण(वनीकरण आणि वृक्षलागवड) ३.सूक्ष्म आणि लघु सिंचन प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी कालवे इ. बांधणे. ४.सिंचनाची सोय उपलब्ध करणे, फलोत्पादनासाठी लागवड तसेच अनुसूचित जाती व जमातीकडील किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या किंवा भूसुधार कायद्यातील लाभार्थींच्या शेतजमिनीचा विकास करणे किंवा इंदिरा निवास योजनेच्या लाभार्थींना मदत करणे.कृषी कर्ज माफी आणि कर्जसवलत योजना २००८ मध्ये नोंदविलेल्या लहान आणि गरीब शेतकऱ्यांना मदत पुरविणे. ५.पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्यातील गाळ उपसणे. ६.भूसुधारणेची कामे. ७.बारमाही रस्त्यांनी गावे जोडणे. ८.पूर नियंत्रण आणि संरक्षण कामे, यात पाणी साचणाऱ्या भागात निचरा करण्यासाठी कामे करणे. ९.तालुका स्तरावर राजीव गांधी भवन ग्रामपंचायत येथे राजीव गांधी सेवा केंद्र निर्माण करणे. १०.केंद्र सरकारशी सल्लामसलत करून राज्य सरकारने कोणतीही अन्य कामे करणे.
35 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यातील नियोजन प्रक्रिया कशी ठरते?या योजनेतील कामाचे नियोजन आणि ती पूर्ण करण्यामध्ये ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचीच मध्यवर्ती भूमिका असते. अ.ग्रामसभेच्या बैठकीत ग्रामपंचायतीकडून किती मजुर पुढील वित्तीय वर्षात लागू शकतात,याचा अंदाज वर्तवतात.त्यानंतर कोणती कामे प्राधान्यक्रमाने घ्यायची हे देखील ठरते.खर्चाचा विचार करता किमान ५० टक्के कामे ग्रामपंचायतीने करणे गरजेचे असते. ब.ग्रामविकास आराखड्याशी गावातील कामांची सांगड घातल्यानंतर ग्रामपंचायत हा प्रस्ताव पुढे कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवते. क.कार्यक्रम अधिकारी १५ दिवसांत कामे मजुर करून जवळच्या पंचायतीकडे पाठवतात.गट आराखडा आणि गट मंजूर अंदाजपत्रक हे जिल्हा कार्यक्रम समन्वयकाकडे(डीसीपी) सादर केले जाते. ड.त्यानंतर ही सर्व कामे जिल्यातील वार्षिक कामांच्या आराखड्याशी पंधरवड्यात जोडतो.त्यात प्राधान्यक्रम,ग्रामपंचायत आधि ब्लॉक यांना असतो. इ.त्यानंतर डीसीपी जिल्ह्याचा,मजुरांचा अंदाजित आकडा व अर्थसंकल्प तयार करतो.त्यानंतर हे ऑनलाइन(mis) मध्ये साठवते.त्यानुसार मंजूर झालेल्या कामगारांचा आकडा पाहून त्यानुसार निधी उपलब्ध होतो.
36 ग्रामपंचायत विभागमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये मजुरी किती दिली जाते?महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याने ठरवून दिलेल्या मानकांनुसारत्याला किंवा तिला मजुरी दिली जाते. त्यासाठी रु.१२७/- हा दर केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे.
विभागाने केलेल्या उपक्रम व नाविन्यपूर्ण बाबी

वृक्षलागवड निमज

ग्रामपंचायत विभाग

वृक्षलागवड निमज १

ग्रामपंचायत विभाग

वृक्षलागवड खरशिंग

ग्रामपंचायत विभाग

वृक्षलागवड खरशिंग 2

ग्रामपंचायत विभाग

वृक्षलागवड खरशिंग 1

ग्रामपंचायत विभाग

माळवाडी जी प शाळा वॉल

ग्रामपंचायत विभाग

बाळू मारुती मुळीक सिंचन विहीर गोमेवाडी

ग्रामपंचायत विभाग

धनाजी साळुंखे ते महेश विलास साळुंखे शेत रस्ता धनगाव

ग्रामपंचायत विभाग

जि.प.शाळा क्रीडांगण तालुका तासगाव, ग्रामपंचायत आळते

ग्रामपंचायत विभाग

जि.प.शाळा क्रीडांगण तालुका तासगाव, ग्रामपंचायत आळते १

ग्रामपंचायत विभाग

जि प शाळा अंकलखोप खेळाचे मैदान तयार करणे

ग्रामपंचायत विभाग

जनावर गोटा तालुका तासगांव, ग्रामपंचायत सावळज

ग्रामपंचायत विभाग

जनावर गोटा तालुका तासगांव, ग्रामपंचायत मांजर्डे

ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायत नागेवाडी तालुका खानापूर क्रिडांगण

ग्रामपंचायत विभाग
पदांचा तपशील
पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
वि. अधिकारी (पं.)651
विस्तार अधिकारी (सां.)13130
ग्रा. वि. अधिकारी342113
ग्राम सेवक52745671
नागरिकांची सनद
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 १. – कार्यालयीन रचना व कार्यपद्धती बाबत सर्व कामकाज येणारे सर्व टपाल यांचे आवक व वितरणावर नियंत्रण ठेवणे २.कार्यालयात येणा-या अभ्यांगतांना कार्यालय प्रमुखांचे गैरहजेरीत मार्गदर्शन करणे ३.कार्यालयातील कर्मचारी यांची कार्यविवरण नोंदवह्या तपासणी करून वरिष्टांचे कडे सदर करणे ४.कर्मचारी दप्तर तपासणी करणे . ५.कार्यालयामधील संबंधित वरिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक कामकाजाची पुर्नवाटणी करून प्रत्येक कर्मचारी यास पुरेसे कामकाज असलेची खबरदारी घेणे. ६. ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी यांनी ठेवलेल्या टिपणीवर अभिप्राय देऊन उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांचेकडे सदर करणे. मा. उपमुकाअ यांनी वेळोवेळी सोपविलेले कामकाजसंजय वसंत थोरवे कनिष्ठ प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी30 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत
2 सहाय्यक गट विकास अधिकारी यांना शासन निर्णय क्र मविसे /10/ 2014/ प्र.क्र.201/आस्था-3(अ), दि.30-10-2014 मधिल सुचि क्र.1 व 2. नुसार व खालील प्रमाणे कामकाज पहाणे 1.जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज वसुली बाबत ग्रामपंचायतीचा नियमित आढावा घेऊन विहीत मुदतीत कर्जाची वसुली ग्रामपंचायतीकडून करुन घेऊन ते जिल्हा परिषदेला सादर करणे 2.ग्रामपंचायतीची कराची वसुली 100 टक्के होण्याच्या दृष्ठीने ग्रामंपचायतीस वेळोवेळी मार्गदर्शन करणे 3.सचिववंची मासिक /पाक्षिक सभा घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती स्तरावर सभेचे आयोजन करुन कनिष्ठ सहाय्यक यांच्या सहकार्याने अहवाल संकलित करणे 4.अंदाज पत्रकाप्रमाणे आणि उपलब्ध स्वियनिधीनुसार ग्रामपंचायतीना समाज कल्याण , महिला व बालकल्याण दिव्यांगाचे कल्याण या बाबीवर खर्च करणे बाबत मार्गदर्शन करणे 5.ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण अहवालातील परिच्छेदाचे अनुपालन ग्रामपंचातीकडून करुन घेणे प्रलंबित परिच्छेद 100 टक्के निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणे 6 .विस्तार अधिकारी (पं) दप्तर तपासणी कामकाजावर संनियंतण करणे 7.ग्रामपंचायतीच्या आर्थिक गैरव्यवहार व अपहार प्रकरणी दोषी (कर्मचारी/लोकप्रतिनिधी) यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठांना सादर करुन गैरव्यवहार होणार नाहीत याकडे लक्ष देणे 8.15 वा वित्त आयोग (ग्रा प स्तर )वार्षिक ककृति आराखडे तयार करुन घेणे विकास कामावर संनियंत्रण करणे 9.संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आर आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम यांना माझी वसंुधरा यासह केंद्र व राज्य शासनाचे विविध कल्याणकारी अभियान राबविण्यासाठी जबाबदारी पार पाडणे 10.विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेलया विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे व मार्गदर्शन करणे 11.जमिन महसुल समाणीकरण , गौण खनीज , मुद्रांक शुल्क अनुदानाचे वाटप करणे .12.विस्तार अधिकारी (पं) यांचे दप्मर तपासणी कामकाजावर नियंत्रण ठेवणे ग्रामपंचायत विभागातील सर्व कामावर सनियंत्रण करणे श्री अविनाश उत्तमक पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी (ग्रामपंचायत)30मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
3 मा मुख्य कार्यकारी अधिकारी व मा अति मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मुल्यमापान अहवाल (RFD) जिल्हा वार्षिक योज जि प स्तर (सर्व साधारण विघयो) मासिक खर्च अहवाल मा जिल्हाधिकारी मा मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संयुक्त आढावा बैठक टिपणी मा जिल्हाधिकारी व मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संयुक्त आढावा बैठक टिपणी ऑन लाईन रिपोर्ट (एमआयएस) पाचवा वित्त आयोग कामकाज संसद आदर्श योजना कामकाज मा पालक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा आढावा सभेचे कामकाज डी पी सी कडील टिपणी तपासुन मा मुकाअ यांना सादर करणे. श्री सचिन शंकर कोळी विस्तार अधिकारी (सांख्यिकी )30मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
4 कार्यालयीन आस्थापाना विषयक संपूर्ण कामकाज/किरकोळ रजा कार्यालयीन कर्मचा-याची वेतन देयके/प्रवास भत्ते देयके अतिकालिक भत्ता देयके/सादील देयक ध्वज निधी/अंध निधी संकलन करणे तीन वर्षावरील व 1 वर्षावरील देयकांना मंजुरी कर्मचारी सेवार्थ कामकाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) यांची दैनंदिनी /प स मासिक सभा कामकाज बाबतचे सर्व कामाकाज. विभागाकडील स्टोअर/ डेडस्टॉक सर्व कामे ग्रामसेवक /ग्रामविकास अध्किारी यांचे वेतन देयके एकत्रीकरण करणे एम टी आर सादर करणे. मा उपमुकाअ (ग्राप) कडील वाहन इंधन व दुरुस्ती देयके तयार करणे कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी श्री अनिल पांडुरंग वासुदेव वरिष्ठ सहाय्यक आथा-330मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
5 ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी आस्थापना/ बिंदू नामावली नोंदवही विषयक सर्व कामकाज कंत्राटी ग्रामसेवक नियमित करणे/कत्रांटी ग्रामसेवक अनामत रक्कम परत करणे ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी सेवा जेष्ठता यादी/आंतर जिल्हा बदली /आश्वासित प्रगती योजनेचे लाभ/गोपनीय अहवाल /मत्ता व दायित्व कामकाज ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी ग्राम पंचायत विभागाकडील एमआयएस अहवाल एकत्रीकरण करुन देणे. ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी स्वेच्छा सेवा निवृत्ती मंजूर करणे ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी 55 वर्षावरील मुदतवाढ/ दिर्घ मुदतीच्या रजा कामकाज ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी प्रशिक्षण कामकाज श्री विनायक तानाजी जाधव वरिष्ठ सहाय्यक आस्था-430मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
6 स्ट्रीट र्लाईट प्रस्ताव मंजूर करणे. जागा हस्तातंरण प्रस्ताव मान्यतेबाबत. जिल्हा परिषद मालमत्ता विषयक कामकाज ग्रामपंचायत मालकीच्या इमारत निर्लेखन करणे ठेाक अशंदान /पुर्नवसन पवन चक्की प्रस्ताव मंजूरी बाबत मासिक अहवाल (कर वसुली, पणीपटटी वसुली, पवन चक्की वसुली ) आठवडी बाजार 15 टक्के मागासवर्गीय खर्च 10 टक्के महिला व बाल कल्याणासाठी खर्च, 3 टक्के अपंगासाठी खर्च. ग्राम पंचायत विभगाकडील मा मुकाअ यांचे रॅकिंग अहवाल. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना करणे. ग्रामपंचायत कर्मचारी आस्थापना. ग्रामपंचायत कारभार विषयक वार्षिक प्रशासन अहवाल प्रकरण 15 वे महाराष्ट्राची आर्थिक पहाणी इ अनुषंगिक कामकाज. श्री रेहान अब्दुलरहमान पटेल कनिष्‌ठ सहाय्य्क ग्राप-230मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
7 जि प स्वीय निधी अंतर्गत योजना (केशकर्तन खुर्ची, पिठाची चक्की/ यशवंत घरकुल इ.) ग्रामसेवक /ग्राम विकास अधिकारी/विस्तार अधिकारी वैद्यकीय देयक प्रतिपुर्ती मुद्रांक शुल्क अनुदान जमिन महसुल /गौण खनिज/जि प उत्पन्न वाढ मागास व आदिवासी अनुदान साहित्तिक /कलाकार मानधन विषयक कामकाज श्री दिपक मधुकर बनसोडे कनिष्ठ सहाय्यक आस्था-630मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
8 ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी /विस्तार अधिकारी यांची सेवा निवृत्ती विषयक सर्व कामकाज जि प स्थायी / सर्वसाधारण सभा / विषय समिती सभा माहिती संकलन जि प सदस्य स्थानिक विकास कार्यक्रम ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची संगणक परीक्षा प्रसुती रजा/ नावात बदल/ हिंदी/मराठी भाषा सुट अपंग भत्ता व्यवसाय कर माफ मंजुरी बाबत /अपंग उपकरणे कामकाज विभागाचे अभिलेख वर्गीकरण कामकाज पर्यावरण कामकाज जैविक विविधता कार्यक्रम पुस्तकांचे गांव /स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन या स्विय निधीतील योजनेचे कामकाज श्रीमंती संगिता मल्लापा कोळी कनिष्ठ सहाय्यक आस्था-730मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
9 जिल्हा वार्षिक योजना जन सुविधा योजना/नागरी सुविधा योजना क वर्ग तीर्थ क्षेत्र योजना राज्य शासन योजना इतर ग्रामीण विकास कार्यक्रम (लोक प्रतिनिधीनी सुचविलेली कामे) अल्पसंख्याक ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम जी .एस .टी .कामकाज एल आर एस कामकाज श्री प्रमोद अदाप्पा लोकापुरे वरिष्ठ सहाय्यक ग्राप-130मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
10 जिल्हा ग्राम विकास निधी बाबतचे सर्व कामकाज अर्थ विभागाशी ताळमेळ घेणेचे कामकाज विभागाकडील अंदाजपत्रक विषयक कामकाज विभागाकडील योजना साठी प्राप्त अनुदानाचे नमुना 1 व 14 श्री अजय महोदेव शेळके कनिष्ठ सहाय्यक लेखा DVDF30मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
11 निवडणुक आचार संहिंता ग्रामपंचायत मासिक सभा /ग्राम सभा विशेष ग्राम समिती / ग्रामपंचायत अंदाज पत्रक /ग्रामपंचायत दप्तर तपासणी ग्रामपंचायत रिक्त पदे /स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत अपहार प्रकरणे /ग्रामपंचायत लेखा शक पूर्तता 90 क प्रकरणे / 179 प्रकरणे (फौजदारी करणेबाबत) बाळासाहेब ठाकरे ग्रा प बांधकाम योजना सरपंच समंेलन /सरपंच समिती सभा/सरपंच मानधन/ग्रा प कर्मचारी मानधन (लेखाशिर्ष 2053) आपत्ती व्यवस्थापन आराखडा विषयक कामकाज श्रीमती स्मिता गिरिष उपाध्ये कनिष्ठ सहाययक आस्था-530मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
12 आवक जावक सर्व कामकाज लोकशाही दिन /भ्रष्टाचार समिती कामकाज सर्व मिटिंग बाबतचे कामकाज / समन्वय समिती/उपमुकाअ यांच्या सर्व मिटिग) झिरो पेंडंसी कामकाज अहवाल यशवंत पंचायत राज कामकाज संकिर्ण कामकाज स्थानिक निधी लेखा परिच्छेद व महालेखाकार मंुबई परिच्छेद मु्‌्द्याचे अनुषंगिक सर्व कामकाज श्री सिद्राम किसन कोळी कनिष्ठ सहाय्यक आवक /जावक बारनिशी30मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली
13 नागरिकांची सनद 1. प्रस्तावना यापूर्वी प्रसिध्द केलेल्या नागरिकांच्या सनदेत यथायोग्य सुधारणा करुन पुन्हा प्रसिध्द करण्यात येत आहे. ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषद, सांगलीकडील महत्वाचा प्रशासकीय विभाग आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम-8 मधील तरतुदीनुसार ग्रामपचायत विभाग नागरिकांची सनद प्रसिध्द करीत आहे. या विभागाशी संबंधीत असणाऱ्या सेवा तत्परतेने, सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा विभाग बांधिल राहील. 2. ग्रामपंचायत विभागाची रचना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगलीचे प्रमुख आहेत. जिल्हा परिषद, सांगलीकडील विविध विभागांची माहिती परिशिष्ट-1 मध्ये सोबत जोडली आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) हे ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख असून त्यांचे अधिपत्याखाली ग्रामपंचायत विभागामध्ये अधिक्षक, टपाल शाखा तसेच 15 आस्थापना शाखा यामध्ये या विभागाकडील सर्व विषयाची विभागणी करण्यात आलेली आहे. या विभागातील कार्यासन निहाय विषयसूची तसेच कार्यासनांबाबतची माहिती सोबत जोडली आहे. (परिशिष्ट-2) 3. कार्यपूर्तीचे वेळापत्रक ग्रामपंचायत विभागामार्फत नागरिकांना प्रत्यक्ष पुरविण्यात येणाऱ्या सेवांच्या कार्यपूर्तीचे वेळापत्रक परिशिष्ट-3 येथे सादर करण्यात आले आहे. 4. नियम / शासन निर्णय या विभागाशी संबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 5. (अ) गाऱ्हाणी तक्रारी यांचे निराकरण कार्यपूर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गाऱ्हाणी असल्यास त्यासंबंधी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) जिल्हा परिषद, सांगली यांचेकडे तक्रार नोंदविता येईल व तक्रार प्राप्त झाल्यापासून सात (7) दिवसात त्यावर यथायोग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) जिल्हा परिषद, सांगली यांची राहील. त्यानंतरही नागरिकाचे समाधान न झाल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे याबाबत त्यांना तक्रार करता येईल. (ब) नागरिकांच्या सनदेचा आढावा / सिंहावलोकन या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबत तथा परिणामकारकतेचा आढावा सामान्य प्रशासन विभागाकडून दरवर्षी दिनांक:-02 मे पूर्वी घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. (क) जनसामान्यांकडून सूचना ही नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व त्यांच्या सुचनांचा दरवर्षी सुधारणाकरताना विचार करण्यात येईल. 6. नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी ग्रामपंचायत विभाग नागरिकांच्या या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटिबध्द आहे. ग्रामपंचायत विभाग आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्यभावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरविताना नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याची राहील.   
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :